नेवासा नगरपंचायतमध्ये पाण्यासाठी नागरिकांचे ठिय्या आंदोलन सात दिवसांत प्रश्न सोडविण्याचे मुख्याधिकार्यांचे आंदोलकांना आश्वासन
नायक वृत्तसेवा, नेवासा
शहरातील सावतानगर उपनगरातील नगरपंचायतीच्या पाईपलाईनवर अनधिकृत जोड दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शिवसेना शहरप्रमुख नितीन जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकार्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी मुख्याधिकारी अंबादास गर्कल यांनी आदोलकांचा पाण्याचा प्रश्न समाजावून घेवून सात दिवसांत सोडविण्याचे आश्वासन दिले.
सावतानगरसाठी स्वतंत्र पाईपलाईन केलेली आहे. परंतु या पाईपलाईनवर अनधिकृत जोड आहेत. तसेच हंडीनिमगाव शिवारातील नागरिकांसाठी देखील याच पाईपलाईनला जोडल्याने पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मुख्याधिकार्यांना जगताप व नागरिकांनी वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. सात दिवसांत आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर महिलांसह आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख नितीन जगताप, सागर शिंदे, रवी रासकर, गणेश जगताप, बाळासाहेब दारकुंडे, दीपक कुरुंदकर, संजय गाडेकर, गणेश कांबळे, किरण गोलवड, सचिन क्षीरसागर, आप्पा घोडेचोर, मयूर वाघ, राजेंद्र जाधव, गणेश हाराळे, कैलास लष्करे, सागर गायकवाड, किशोर मगर, मोहन कळमकर, अरुण आहेर, अल्केश जाधव, महेश यादव, कैलास जाधव, नीलेश रासकर, गणेश शिंदे, मुकेश जाधव, भरत पारधे, अजिंक्य टेमक, आकाश सौदागर, प्रकाश बनकर, वैभव यादव उपस्थित होते.
नगरपंचायतच्या चार वर्षांच्या काळात सावतानगर येथे रस्ते, भूमिगत गटारी, पथदिवे आदी सुविधा दिल्या नाहीत. शहरात कामे सुरु असून साधे पिण्याचे पाणी देखील मिळत नाही. मात्र घरपट्टी, पाणीपट्टी आदी कर वसूल केले जातात.
– नितीन जगताप (शहरप्रमुख, शिवसेना नेवासा)
पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात आर्थिक भुर्दंड सोसून पाण्याची गरज भागवावी लागत आहे. तरी पाणी पुरवठा सुरळीत करावा.
– मंगल क्षीरसागर (रहिवासी, सावतानगर)