संगमनेर तालुक्यात आजही आढळले अडिचशे रुग्ण! शहरी रुग्णसंख्येला लागलेली ओहोटी कायम; ग्रामीण रुग्णसंख्या मात्र उंचावलेलीच.. संपूर्ण जिल्ह्यातील तब्बल 46 नागरिकांचा कोविडने घेतला बळी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्याच्या रुग्णवाढीला मिळालेली गती कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र असून आजही शासकीय प्रयोगशाळेचे अहवाल प्रलंबित असतांनाही तालुक्यातील तब्बल 247 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या एकूण अहवालांमध्ये खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या दोनशेहून अधिक अहवालांचा समावेश आहे. एकीकडे तालुक्याच्या रुग्णवाढीची गती वाढलेली असतांना दुसरीकडे शीरी रुग्णसंख्येतील घटही कायम असल्याने एका डोळ्यात आनंदाश्रृ तर दुसर्या डोळ्यात चिंतेचे पाणी असे विरोधाभाशी चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे. आजच्या एकूण बाधितांमध्ये संगमनेर शहरातील अवघ्या 40 जणांचा समावेश असून 206 रुग्ण ग्रामीणभागातील आहेत. या रुग्णवाढीने तालुका आता 14 हजार 713 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येत थोडीफार घट नोंदविली गेली असून गेल्या चार दिवसांतील अहवालातून एकूण रुग्णसंख्या तीन हजारांच्या खाली आली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे एकंदरीत चित्र काहीसे दिलासादायक दिसत असले तरीही अहमदनगर महापालिका क्षेत्र, नगर ग्रामीण, राहाता, संगमनेर, कर्जत, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, अकोले, पारनेर व श्रीगोंदा या तालुक्यांमधील रुग्णगतीला चांगलाच वेग आल्याचे चित्र दिसत आहे. अहमदनगर शहरासह संगमनेर, कोपरगाव, राहाता व श्रीरामपूरमध्ये आवश्यक असलेली खासगी व शासकीय आरोग्य सुविधा असल्याने संक्रमणात वाढ होवूनही या तालुक्यांची आरोग्यस्थिती अद्यापही नियंत्रणात आहे. मात्र वारंवार जाणवणार्या ऑक्सिजन टंचाईमुळे जिल्ह्यात दिवसाआड ऑक्सिजन बाणी निर्माण होत आहे.
आज संगमनेर तालुक्यातील एकूण 247 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प0ाप्त झाले आहेत. विशेष म्हणजे या अहवालांमध्ये शासकीय प्रयोगशाळेच्या अवध्या दोनच अहवालांचा समावेश असल्याने जिल्हा यंत्रणेकडून संगमनेरच्या रुग्णवाढीचे आकडे कमी दाखवण्याचा तर प्रयत्न नाही ना अशी शंकाही जनमानसातून व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात मात्र घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात संशयीतांचा स्राव नमुना घेणार्यांनाच कोविडची बाधा झाल्याने गेल्या काही दिवसांपासून स्राव घेण्याचे प्रमाणच कमी झाल्याचे वास्तवही समोर आले आहे. आज खासगी प्रयोगशाळेकडून 205 व रॅपीड चाचणीतून 40 जणांचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून शहरी रुग्णगती खालावल्याचे दिलासादायक चित्र असून आजही ते कायम आहे.
आजच्या एकूण 247 अहवालांमध्ये संगमनेर शहरातील भारतनगर परिसरातील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 45 व 36 वर्षीय महिला, देवाचा मळा येथील 35 व 16 वर्षीय तरुण, घोडेकर मळ्यातील 42 वर्षीय तरुणासह 18 वर्षीय तरुणी, गोविंद नगरमधील 29 वर्षीय महिला, इंदिरानगर मधील 26 वर्षीय महिला, जनता नगर मधील 34 वर्षीय तरुण, लालतारा सोसायटीतील 44 वर्षीय महिला, मालदाड रस्त्यावरील 60 व 36 वर्षीय महिला, माळीवाड्यातील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 35 वर्षीय दोघे तरुण, मोनिपूर्यातील 36 वर्षीय तरुण, कोष्टी गल्लीतील 84 वर्षीय वयोवृद्धासह 57 वर्षीय इसम, वैदुवाडीतील 40 वर्षीय तरुण, अकोले नाक्यावरील 38 वर्षीय तरुण,
गणेश नगरमधील 39 वर्षीय महिलेसह 35 वर्षीय तरुण, पोफळे मह्यातील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 56 वर्षीय महिला, रहेमत नगरमधील 39 वर्षीय महिला, नवीन नगर रस्त्यावरील 44 वर्षीय इसम, अकोले बायपास वरील 44 वर्षीय इसम, सावतामाळी नगरमधील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व केवळ संगमनेर असा उल्लेख असलेल्या 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 54, 53 व 41 वर्षीय इसम, 46, 40, 30 व 28 वर्षीय महिलांसह 21, 18 व 16 वर्षीय तरुणी, मंगळापूर येथील 45 वर्षीय महिला व 31 वर्षीय तरुण, नांदुरी दुमाला येथील 45 वर्षीय इसमासह 25 वर्षीय तरुण, निमगाव टेंभीतील 64 वर्षीय महिला, निमगाव येथील 21 वर्षीय तरुणासह 14 वर्षीय मुलगा, निमोण येथील 25 वर्षीय तरुणासह 13 वर्षीय मुलगा,
कुरकुंडी येथील 54 वर्षीय इसमासह 15 व 13 वर्षीय मुली, कुरकुटवाडीतील 43 वर्षीय तरुण, शेळकेवाडीतील 32 वर्षीय महिला, भोजदरीतील 28 वर्षीय महिला, म्हसवंडीतील 35 वर्षीय तरुण, बोटा येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 28 वर्षीय महिला, शिबलापूर येथील 78 व 48 वर्षीय महिलांसह 22 वर्षीय तरुणी, निमगा जाळी येथील 21 वर्षीय तरुणी, सोनुशी येथील 55 वर्षीय इसम, सादतपूर येथील 31 व 26 वर्षीय तरुणांसह 38 वर्षीय महिला, पिंप्री लौकीतील 32 वर्षीय तरुण, लोहारे येथील 42 वर्षीय महिला, चणेगाव येथील 52 व 51 वर्षीय इसमांसह सहा वर्षीय बालक, औरंगपूर येथील 30 वर्षीय तरुण, अंभोरे येथील 50 वर्षीय महिलेसह बारा वर्षीय मुलगी, झोळे येथील 45 वर्षीय इसमासह 41 व 38 वर्षीय महिला,
उंबरी बाळापूर येथील 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 29 वर्षीय महिला, पावबाकीतील 35 व 32 वर्षीय तरुण, पेमगिरीतील 69 वर्षीय महिला, पिंपळे येथील 55 वर्षीय इसम, पिंपळगाव कोंझिरा येथील 35 वर्षीय तरुणासह 25 वर्षीय महिला, पिंपळगाव माथा येथील 42 वर्षीय तरुण, पिंपरणे येथील 49 वर्षीय इसमासह 43 वर्षीय तरुण, पोखरी हवेली येथील 43 व 28 वर्षीय तरुण, रायते येथील 32 वर्षीय महिला, सायखिंडीतील 35 वर्षीय तरुण, संगमनेर खुर्दमधील 52 व 38 वर्षीय महिला, सारोळे पठार येथील 60 वर्षीय महिला, सावरगाव घुले येथील 45 वर्षीय महिलेसह 41 वर्षीय तरुण, सावरगाव तळ येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 49 व 45 वर्षीय इसम, 28 व 21 वर्षीय तरुण आणि 65, 55 व 42 वर्षीय महिला,
सोनेवाडीतील 55 वर्षीय इसम, तळेगाव दिघे येथील 35 व 25 वर्षीय महिलांसह 29 व 23 वर्षीय तरुण, खळी येथील 50 वर्षीय इसमासह 40 वर्षीय महिला, रायतेवाडीतील 42, 22 व 20 वर्षीय तरुण आणि 14 वर्षीय मुलगी, कासारा दुमाला येथील 40 वर्षीय तरुण आणि 36 वर्षीय महिला, आश्वी खुर्द मधील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 56 व 55 वर्षीय इसम, 43, 27 व 23 वर्षीय तरुण, 15 व 14 वर्षीय मुले, 55, 47, 35 व 34 वर्षीय महिला आणि 17 वर्षीय तरुणी, आंबी खालसा येथील 50 वर्षीय महिला, चिखलीतील 17 वर्षीय तरुणी, ढोलेवाडीतील 60, 47, 30 व 26 वर्षीय महिला, 57 व 48 वर्षीय इसम, 41, 32 व 30 वर्षीय तरुण आणि आठ वर्षीय मुलगी, डिग्रज मालुंजे येथील 54 वर्षीय इसम, गुंजाळवाडी परिसरातील 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 56 वर्षीय इसम, 35, 30 व 23 वर्षीय तरुण आणि 53 व 32 वर्षीय महिला,
जवळे कडलग येथील 34 वर्षीय तरुणासह 16 वर्षीय मुलगी, जोर्वे येथील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 45 वर्षीय इसम आणि 20 वर्षीय तरुणी, खांडगाव येथील 26 वर्षीय तरुण, कनोली येथील 38 वर्षीय तरुणासह सहा व दोन वर्षीय बालिका, सुकेवाडीतील 28 वर्षीय महिला, 20 वर्षीय तरुण व 15 वर्षीय मुलगी, नान्नज दुमाला येथील 80 वर्षीय वयोवृद्धासह 80 वर्षीय महिला व 36 वर्षीय तरुण, निंभाळे येथील 45 वर्षीय महिलेसह 21 वर्षीय दोन तरुण, राजापूर येथील 38, 32 व 25 वर्षीय तरुणांसह 72, 60, 34 व 26 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुणी व 15 वर्षीय मुलगी, समनापूर येथील 43, 41, 32, 30, 29 व 23 वर्षीय तरुण, वडगाव लांडगा येथील 36 वर्षीय तरुणासह 33 व 32 वर्षीय महिला,
वडगाव पान येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 28 वर्षीय दोन तरुण, 61, 42 व 38 वर्षीय महिला व 21 वर्षीय तरुणी, चिकणी येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, चिंचपूर येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 57 वर्षीय इसम, 32, 31 व 26 वर्षीय तरुण आणि 47 व 28 वर्षीय महिला व एक वर्षीय बालक, देवकौठे येथील 52 वर्षीय इसम, धांदरफळ खुर्द येथील 51 वर्षीय इसमासह 32 व 28 वर्षीय तरुण, कोकडवाडीतील 38 वर्षीय तरुण, खराडी येथील 55 वर्षीय इसमासह 29 वर्षीय तरुण व 20 वर्षीय महिला, कोल्हेवाडीतील 19 वर्षीय तरुण, मालदाड येथील 78, 58 व 25 वर्षीय महिलांसह 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 31 व 27 वर्षीय तरुण, वाघापूर येथील 28 वर्षीय तरुण,
घुलेवाडीतील 75 व 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 59, 57 व 53 वर्षीय इसम, 43, 35, 29, 28 व 25 वर्षीय तरुण, 78, 72, 67 वर्षीय दोन, 66, 50, 45, 42, 38, 35, 32 व 29 वर्षीय महिला व 16 वर्षीय दोघी आणि 10 वर्षीय मुली तसेच अकोले येथील 40 वर्षीय महिला अशा एकूण 247 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुका आता 14 हजार 713 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.
जिल्ह्यातील रुग्णसंख्येतही आज काहीशी वाढ झाली असून आज 2 हजार 935 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्र 657, नगर ग्रामीण 307, राहाता 260, संगमनेर 247, श्रीगोंदा 238, राहुरी 198, जामखेड 153, शेवगाव 128, कोपरगाव 111, श्रीरामपूर 110, पाथर्डी 105, पारनेर 103, नेवासा 100, कर्जत 78, भिंगार लष्करी परिसर 75, अन्य जिल्ह्यातील 42, लष्करी रुग्णालयातील 12 व अकोले येथील अवघ्या 11 जणांचा समावेश आहे. आज जिल्ह्यातील तब्बल 46 नागरिकांचा कोविडने बळी घेतला असून जिल्ह्यातील एकूण कोविड बळींची संख्या आता 1 हजार 965 झाली आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 1 ला 71 हजार 87 झाली आहे. आज जिल्ह्यातील विविध तालुक्यातील 3 हजार 130 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे उपचार पूर्ण करणार्यांची एकूण संख्या आता 1 लाख 46 हजार 658 झाली आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याची सरासरी 85.72 टक्के आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ शुक्रवारी जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. सकाळी 8 वाजता ते पुण्याहून थेट श्रीरामपूरकडे येतील. 11 वाजता तेथील आढावा घेतल्यानंतर ते नेवासा येथे जाणार आहेत. तेथून अहमदनगर येथे जावून कोविडचा आढावा व लसीकरणाबाबत माहिती घेणार आहेत. शुक्रवारी अहमदनगरमध्ये मुक्कामी थांबून 1 मे रोजी शासकीय ध्वजारोहन व त्यानंतर चौदाव्या वित्त आयोगातून जिल्ह्यासाठी 45 रुग्णवाहिकांचे हस्तांतरण त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर मोटारीने शिर्डी आणि तेथून मुंबईकडे ते रवाना होतील.