अवकाळी पावसाने वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान

नायक वृत्तसेवा, संगमनेर
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका ‘पुन्हा’ एकदा बळीराजासह छोट्या-मोठ्या उद्योगांना बसला आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यात वीटभट्टी चालकांचे लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून निसर्गाचा लहरीपणा अनुभवण्यास मिळत आहे. याचा रब्बीतील पिकांवरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. कांदा, गहू, हरभरा, मका, द्राक्षे व डाळिंब या पिकांना मोठा फटका बसला आहे. या संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले असतानाच छोटे-मोठे उद्योग करुन उदरनिर्वाह करणार्‍या व्यावसायिकांना देखील मोठा फटका बसला आहे. सर्वात जास्त वीटभट्टी चालकांना बसला आहे. कोरोना संकटामुळे कर्ज अथवा हातउसणे करुन संगमनेर तालुक्यातील वीटभट्टी व्यावसायिकांनी व्यवसायासाठी भांडवल उभे केले. यातून सावरतो ना सावरतो तोच निसर्गाने ‘पुन्हा’ एकदा झटका दिला. गुरुवारी व शुक्रवारी अवकाळीने बरसात केल्याने वीटभट्ट्यांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. तयार केलेल्या कच्च्या विटा आणि पक्क्या विटाही पाण्यात गेल्या आहेत. यामुळे वीटभट्टी चालक खचले असून, शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *