जयहिंदकडून दिवाळीनिमित्त सैनिकांना फराळ अभिनव उपक्रमात तालुक्यातील कुटुंबेही सहभागी होणार


नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशवासियांच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस सीमेवर पहारा देत असलेल्या संगमनेर तालुक्यातील भारतीय सैनिकांच्या कुटुंबियांना जयहिंद महिला मंचच्या भगिनींकडून दिवाळीनिमित्त फराळ वाटप करण्यात आले.

संगमनेरातील यशोधन संपर्क कार्यालयात जयहिंद महिला मंच व स्वराज सैनिक कल्याण संस्था यांच्यावतीने तालुक्यातील आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबियांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, निर्मला गुंजाळ, सुनंदा दिघे, प्रमिला अभंग, आशा वाकचौरे, छाया उपाध्ये, शिला करंजेकर, जुलेखा शेख, सुनीता कांदळकर, भिकाजी भागवत, प्रकाश कोटकर, भानुदास पोखरकर, सुभाष कुडेकर, जग्गनाथ खामकर, काशिनाथ खिल्लारी, सुनील थोरात, प्रवीण गुंजाळ, विक्रम थोरात, संजय रहाणे, शिवाजी रहाणे, संजय अभंग आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भारतीय सैनिक हे कायम आपल्या परिवारापासून हजारो किलोमीटर दूर असतात. सणासुदीच्या काळातही ते घरी येत नाही. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण असतानाही हे सैनिक आपल्या जनतेसाठी कर्तव्यावर असतात. रात्रंदिवस ऊन, वारा, पाऊस ते डोक्यावर घेऊन आपले कर्तव्य पार पाडत असतात. ते दिवाळी किंवा सणांना कुटुंबियांसोबत नसतात. त्यांच्या प्रति आदर भावना व्यक्त करताना संगमनेर तालुक्यातील बचत गट, महिला मंडळ यांच्याकडून सैनिकांना दिवाळी फराळाचे पदार्थ उच्च प्रतिच्या पॅकिंगमध्ये त्यांच्या कुटुंबियांना दिले आहेत. या अभिनव उपक्रमात तालुक्यातील अनेक कुटुंबही सहभागी होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे दिली आहे. यावेळी याप्रसंगी महिला, कार्यकर्ते, आजी-माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी कौतुक केले.

Visits: 8 Today: 1 Total: 79615

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *