कोतूळ येथील जवान अरुणाचल प्रदेशमध्ये बेपत्ता

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील कोतूळ येथील रहिवासी व अरुणाचल प्रदेशमध्ये सैन्यात नोकरीस असलेला जवान बेपत्ता झाला आहे. राजेंद्र बाळासाहेब देशमुख (वय 39, रा. कोतूळ, ता. अकोले) असे या जवानाचे नाव आहे.

भारतीय सैन्य दलात भटिंडा 111 रॉकेट रेजिमेंट येथे हवालदार म्हणून सैन्यात सेवेत आहे. त्यांची बदली ईटानगर अरुणाचल प्रदेश एनसीसी बटालियन ईटानगर येथे झाली आहे. दरम्यान, 15 दिवसांच्या रजेवर ते घरी आले होते. त्यानंतर (ता. 26 जून, 2021) रोजी ते कर्तव्यावर रूजू होण्यासाठी कोतूळवरून नाशिक येथून रेल्वेने अरुणाचल प्रदेश ईटानगर याठिकाणी कामावर रूजू होण्यासाठी गेले होते. ते (ता. 29 जून, 2021) रोजी ईटानगर येथे कामावर हजर झाले. त्यानंतर (ता. 29 व 30 जून, 2021) रोजी तेथेच क्वॉरंटाईन राहिले. 1 जुलै, 2021 रोजी रात्री 12.30 वाजता रेल्वेचे रिझर्व्हेशन करून ईटानगर ते गुवाहटीपर्यंत त्यांनी प्रवास केला. त्यानंतर त्याच दिवशी 1 जुलैला गुवाहाटी येथे आले. तेव्हापासून त्यांचा संपर्क तुटला आहे. तो आजपर्यंत त्यांचा संपर्क झाला नाही. हा सर्व प्रकार घातपात असल्याचा संशय पत्नी सुनीता राजेंद्र देशमुख यांनी व्यक्त केला आहे. याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

Visits: 163 Today: 1 Total: 1881719

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *