जयहिंद लोकचळवळच्यावतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्लोबल कॉन्फरन्स
जयहिंद लोकचळवळच्यावतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्लोबल कॉन्फरन्स
सॅम पित्रोदा, फ्रँक इस्लाम यांसह आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ज्ञ साधणार संवाद
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सुदृढ लोकशाही व निरोगी समाजनिर्मितीसाठी कार्यरत असणार्या जयहिंद लोकचळवळच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर, 2020 या काळात जागतिक शांतता, सुसंवाद व प्रगतीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकीय विश्लेषक सॅम पित्रोदा, अमेरिकेचे नेते फ्रँक इस्लाम यांसह आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सहभाग असलेली ऑनलाइन ग्लोबल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक, अध्यक्ष आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी दिली आहे.

या ग्लोबल कॉन्फरन्सबाबत माहिती देताना आमदार डॉ.तांबे म्हणाले की, मागील 20 वर्षांपासून जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून युवकांना रचनात्मक कार्याची दिशा देत सुदृढ लोकशाहीसाठी व निरोगी समाजनिर्मीतीसाठी काम होत आहे. जगातील सध्याची अस्थिरता व भीतीचे वातावरण यावर मात करत जागतिक शांतता, सामाजिक सलोखा व मानवतेच्या वृद्धीसाठी जयहिंद लोकचळवळच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांचा समावेश असलेली ग्लोबल कॉन्फरन्सचे ऑनलाइन आयोजन केले आहे.

यामध्ये शुक्रवारी (ता.2) पहिल्या सत्रात सायं. 7 ते 8 यावेळेत महात्मा गांधी ः शांतता, सुसंवाद आणि प्रगती या विषयावर भारतीय संगणक व तंत्रज्ञान क्रांतीचे जनक स्व.राजीव गांधी यांचे सल्लागार व टेलीकॉम विझार्डचे संचालक आणि संशोधक सॅम पित्रोदा, इंडो अमेरिकन नागरी नेते व आयटी उद्योजक फ्रँक इस्लाम, जर्मनीचे राजकीय नेते क्लॉडिया क्रॉफर्ड, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अमेरिकेतील न्यू जर्सी येथील एडिसनचे महापौर थॉमस लॅकी, भारतातील ज्येष्ठ विचारवंत डॉ.संदीप वासलेकर, अमेरिकेचे मायकल क्रॉली यांच्या उपस्थितीत या सत्रात परिसंवाद होणार आहे. तर रात्री 8.30 ते 9.30 यावेळेतील दुसर्या सत्रात 21 व्या शतकात महात्मा गांधींच्या विचारांचे महत्व याविषयांवर ज्येष्ठ पत्रकार खा.कुमार केतकर, सुरेश द्वादशीवार, तुर्कीचे इंग्रजी तज्ज्ञ उगर इरूलकर, ज्ञानेश्वर यवतकर, गार्गी गाडे मार्गदर्शन करणार आहेत.

शनिवारी (ता.3) तिसर्या सत्रात सायं. 7 ते 8 यावेळेत सुदृढ समाज ः निरोगी समाज व्यवस्था या विषयावर जयहिंदचे संस्थापक आमदार डॉ.सुधीर तांबे, औषध तज्ज्ञ डॉ.रवींद्र गोडसे, इंग्लडमध्ये वैद्यकीय सेवा देणारे डॉ.संग्राम पाटील, ओमान देशामधील सामाजिक कार्यकर्त्या प्रा.डॉ.नितू चाबरिया, सबरिना चौधरी, अरीफ रेहमान, डॉ.टायलर व्हर्नन हे मार्गदर्शन करणार आहे. तर रात्री 8.30 ते 9.30 या वेळेतील चौथ्या सत्रात सामूहिक शेती व शाश्वत उत्पन्न या विषयावर बारामती अॅग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार, कृषी विभागाचे सहाय्यक मुख्य सचिव डॉ.सुधीर गोयल, आदिती अमित देशमुख लातूर), प्रशासकीय अधिकारी विमलेंद्र शरण, अन्न संधोधनातील डॉ.मुकूंद कर्वे, व्हिट्रीट चेलवन (पाँडेचिरी) हे मार्गदर्शन करणार आहेत.
रविवारी (ता.4) पाचव्या सत्रात सायं. 7 ते 8 यावेळेत महिलांचे आर्थिल सक्षमीकरण व सामाजिक सुरक्षितता या विषयावर संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री कल्पना सरोज, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या फायनान्स ऑफिसर पूजा कराचीवाला, सेना खासदार प्रियंका चतुर्वेदी, डॉ.क्लारिसा (ऑस्ट्रेलिया), पल्लवी शिंदे (अमेरिका), डॉ.यूझोमी यम्मामोटो (जपान), डॉ.हेमा अब्दुल हलीम (जॉर्डन), अॅड.स्मिता सिंगलकर (नागपूर), प्रियंका वामन (अभिनेत्री) तर रात्री 8 ते 9 या वेळेतील सहाव्या सत्रात लोकशाही या विषयावर कन्हैया कुमार, डॉ.कार्लस टर्नर (लंडन), ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, मायकल क्रावली (अमेरिका), डॉ.ज्ञानेश्वर मुळे, जर्मी केल्म (अमेरिका), हिरालाल पगडाल, केतकी भिसे (लंडन) हे संवाद साधणार आहेत. ही ग्लोबल कॉन्फरन्स फेसबुक पेज व सर्व समाज माध्यमांवर उपलब्ध असणार आहे. तरी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सहभाग असलेल्या या प्रथम ग्लोबल कॉन्फरन्समध्ये अधिकाधिक तरुणांनी व नागरिकांनी सहभाग घ्यावा असे अवाहन जयहिंद लोकचळवळीचे समन्वयक संदीप खताळ, आंतरराष्ट्रीय समन्वयक अशोक खैरनार व सूरज गवांदे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

